Online बिनलाइन


     इंटरनेट आणि स्मार्टफ़ोन च्या जमान्यात सर्व काहि शक्य झाले आहे. कपड़े, मोबाइल, घरातील वस्तुंन पासून तर रोज लागणार दूध, किराना ही आपण घर बसल्या ऑनलाइन मागउ शकतो. एवढच काय तर आज काल Zomato, Swiggy सारख्या अनेक e-commerce App वरुण जेवण ही मागउ शकतो. हे खर तर उपयोगी ही खुप आहे, आणि वेळ ही खुप वाचतो, पण खरच या धावपळीच्या जीवनातून वाचवलेला वेळ आपण उपयोगात आणतो का ? किती लोक आपल्या परिवारा सोबत वेळ घालवतात ? आधी घरातील साधा किराना करायचे म्हटले तरी तालुक्याच्या गावी नाहीतर एखाद्या बाजार पेठेच्या गावी जावे लागत होते असे आपले आजी-आजोबा आपल्याला सांगतात, आणि ते खरही आहे. ते ही अगदी बस च्या वेळेनुसार. आज हे सगळ घरबसल्या, गांवातच मिळत. शिवाय वेळ ही वाचतो. पन एवळ असुनही काय उपयोग ज्याला विचाराव तो वेळच नाही मिळत सांगतांना दिसतो.

     आधी TV हा फार कमी लोकांनकड़े असायचा. तिथेच सगळी लहान मुल TV पाहायला जायची. आणि Light गेली की सगळे कल्लोळ करत घरा बाहेर पाळायचे आणि दूसरे काहितरी करमनुकीके साधन शोधायचे. स्मार्ट फ़ोन आल्यापसुन करमनुकी ची साधन शोधायची गरज जनु कुणाल भासतच नाही. जूने खेळ ही सगळे कालबाह्य झाले. स्मार्ट फ़ोन ने ही पिढी गरजे पेक्षाही स्मार्ट होतांना दिसत आहे. प्रेत्यकाचे स्वतःचेच एक ऑनलाइन विश्व (Whatsapp, Facebook, Instagram etc.) तयार करुण ठेवले आहे, त्याला आता आपणही अपवाद नाही. म्हणूनच की काय तर अगदी मांडी ला मांडी लाउन बसलेला एखादा मित्र मोबाइल मधून एखादा चांगला विनोद वाचून न दाखवता तो सरळ व्हाट्सएप वर पाठवन्यात धन्यता मानतो. मग प्रश्न पडतो काय उपयोग अश्या गोष्टीचा ज्या सांगायला एकमेकांना जोडतात, पन प्रत्यक्षात तस आहे का ?
यात दोष स्मार्टफोन इंटरनेट वा e-commerce सारख्या साईट चा नसून लोकांच्या मानसिकतेचा आहे.

आणि शेवटी एवढच म्हणावेसे वाटत.

तुम भी गर्दन उठाकर जी सकते हो दुनिया में…
बस एक बार मोबाइल घर पर ही भूल जाना !!