पाऊस..... पहिला पाऊस..!!

पाऊस आणि तोहि पहिला पाऊस असला तर क्या बात है..!!

         आपल्याला पहिल्या असलेल्या प्रत्येक गोष्ठि नेहमीच स्मरणात राहतात, जसे पहिले प्रेम, पहिली भेट, पहिला मित्र/मैत्रीण, पहिली शाळा/कॉलेज, पहिला वर्ग आणि बरेच काही, तसाच प्रत्येक पावसाळ्यातला पहिला पाऊसही नेहमीच स्मरणात राहणारा असतो. या पहिल्या पावसा सोबत बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतात आणि मन प्रसन्न होत .
            उन्हानें तापलेल्या जमिनीवर जेव्हा हा आतुरतेने वाट पाहायला लावनारा पाऊस पडतो तेव्हा त्या जामिनितुन जो मृदुगंध येतो त्याची सर जगातील भारीतल्या भारी परफ्यूम ला येणार नाही. असा हा पहिला पाऊस येतो आणि हळू हळू सर्व कही बदलून टाकतो, निसर्ग हा सर्विकड़े हिर्वागार होतो, सर्वीकडे गारवा होतो, त्याच सोबत प्रत्येकाचे मन ही ह्या पावसाने सुखावले जातात आणि मनात जपलेल्या काही आठवणीही हिरव्या होतात.
          हाच तो ऋतु असतो ज्याची सर्वजन आतुरतेने वाट पाहत असतात. कुणाला मित्रांन सोबत दूर डोंगर पायथ्याशी फिरायला जायचे असते तर कुणाल प्रियसीला घेऊन घाटाच्या वळणदार रस्त्याने फिरायला जायचे असते. काहींना फक्त खिड़कित बसून हातात चहा चा कप घेऊन पाऊस अनुभवायचा असतो तर काहींना या पावसात ओलंचिंब भिजायचे असते. मलाही पहिल्या पावसात हातातल सगळ काम सोडून पावसात जाऊन उभ रहाव आणि मनसोक्त भिजावस वाटत जसे लहानपणी भिजायचो, पन आता हा अनुभव घ्यायला आपन लहान नाही अशी जाणीव हातातल काम मला करुण देत असत, बहूदा माझ्या सारखीच जाणीव बऱ्याच जणांना होत असावी. प्रत्येकजन आपआपल्या पद्धतीने पावसाचा अनुभव घेत असतो, आणि घ्यायलाच पाहिजे. हाच तो ऋतु आहे जो आपल्याला लहानपणीच्या दिवसांची आठवन करुण देतो. पावसात भिजणे, चिखलात खेळने, डाबक्याच्या पाण्यात खेळने, शाळेतुन येतांना छत्री सोबत असूनहि भिजणे, भिजलेल्या ओल्या मातीची खेळणी बनवणे, पाण्याच्या  वाहत्या प्रवाहात कागदाची नाव बनवून सोडणे खरंच किती सुंदर आणि वेगळे असतातना ते दिवस !
        या दिवसात खिडकीत चहा नाहीतर कॉफी चा कप हातात घेऊन बसलेले कवीला कविता सुचतात, चित्रकाराला छान चित्र काढावेसे वाटतात तर लेखकाची लेखणी वाऱ्यासारखी बोलू लागते. प्रियकराला प्रियसीच्या आठवणीत प्रेमावर शायरी करावीशी वाटते तर प्रियसीला आपल्या प्रियकराला चोरून पाहावेसे वाटते. असा हा प्रेमाचा पाऊस सगड्यांना प्रेमाने मोहून टाकणारा असतो.म्हणूनच सगळे ह्या पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात.
        जेव्हा हा पहिला पाऊस येतो तेव्हा नकळतच ओठांवरती गाणे गुणगुणले जाते.

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।
  स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास  
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।।

Kanda Bhaji

1 comment: