मातितल बालपण आणि बालपणातलं गावं ....

गांव आणि गावतल बालपण खरच एक वेगळाच अनुभव असतो,
गावातुन नोकरी आणि व्यवसाया निम्मित शहरात आलेल्या प्रत्येकाला ते हुबेहुब आठवत असत, प्रत्येकाला ते गावतले लहानपणीचे खेळ मित्र व ठराविक ठिकान  हें नक्कीच आठवतात आणि नकळत चेहऱ्यावर हसू आणि डोळे ओले होतात.
         अगदी कोणत्याच गोष्टिला सीमा नसलेल बालपण जर का कुठे असेल तर ते गावातच. शाहरातल्या लहान मुलांचे लहानपण पाहुन मनोमन देवाचे आभार मानावेसे वाटतात, कारण आम्ही जे जगलो ते बालपण हया शाहरतल्या बालपणाहुन कितीतरी चांगले आणि मजेशिर होत. शहरात बालपण विकत घ्यावे लगते, Video games, Swimming class  आणि फिरायल महागडी Garden पावला-पावला वर पैसा देऊन आंनद विकत घेण्याची कसरत चाललेली असते. है चार भिंतितल लाहनपन कस बर आठवेल या मुलांना, बर आठवले तरी काय तर मोबाईल मधले खेळ नाही तर सुट्टीच्या दिवशी Garden आणि Hotel मध्ये घालवलेला दिवस.
पन गावाकडच्या मुलांन कड़े शेतात घालवलेल्या दिवसांन पासून तर अगदी ढोपर-कोपर फूटे पर्यंत खेळलेले खेळ आठवतात. बर खेळ ही एक दोन नाही तर प्रत्येक ऋतू प्रमाणे बदलनारे खेळ. हल्ली बरेच खेळ गांवातुनही मोबाईल मुळे हद्दपार झाले व काही होण्याच्या वाटेवरती आहेत. पन मला आठवत की गावकडे अगदी साबरीला येणाऱ्या म्हशी (साबरीच्या झाळाची पाने) ज्वारी च्या तोट्यान पासून बनवलेलि खेळणी, मातीची खेळणी आणि सायकल चा जूना टायरही अगदी आनंदाने खेळायचे.

              उन्हाळ्याच्या सुट्टीत तर भवरा, गोट्या  व क्रिकेट खेळण्याची धूम असायची. उन्हाळ्यात शाळेला सुट्टी लागली की घरातल्यान बरोबर गांव गल्लीच्या लोकांना संकट पडायच. त्यांना माहित होत कारण आता काय ही पोर कुणाचे ऐकायचे नाहीत म्हणून, अगदी उन्हाचे ही नाही. भर दुफारी उन्हात फक्त मुलांचाच गोंधळ गल्लीत असायचा, यातच गल्लीतल्या एखाद्या वयोवृद्ध वा प्रतिष्ठित व्यक्तिची ओरड़ ही पडायची पन त्याचा आम्हाला कसला कमीपना किवा फरक पडत नव्होत. आणि पडलाच फरक तर फार फार गल्ली बदलायची, मूल ही तीच आणि खेळ ही तोच फक्त दुसर्या गल्लीत जाऊन खेळायचा.
          पन शहरात मात्र सगळ वेगळेच पाहायला मिळत, येथे आई वडिलांना शाळा सुरु झाल्या की चिंता पड़ते की आता रोज काहिना काही शाळेचा गृहपाठ येणार आणि तो बिचार्या आई वडिलांना करावा लागणार. दर महिन्याला पालक सभा, आणि Projects च्या नावाखाली बरेच काही. आणि सुट्टी लागली की यापासून सुटका होत नाही तोवर मुलांचा प्रश्न आई मी काय करु ? पप्पा मी काय खेळू ? कुठे जाऊ ?  पन गावात मूल कुठे गेली काय खेळतायत याची चिंता आई वडिलांना कधीच नव्होती. याचा अर्थ असा मुळीच नाही की त्यांना त्यांच्या मुलांची काळजी नव्होती म्हणून, पन त्यांना माहित होत की ये गावतच कुठे न कुठे खेळत असेल म्हणून. आई मात्र जेवनाची वेळ चुकली की जेवना सोबत शिव्या पन खाउ घालायची. आणि शाळेची तर चिंताच सोळा, त्यांना आपली पोर पुड़च्या वर्गात गेले अस तेव्हा कळायच जेव्हा ते नवीन वह्या, पुस्तक किंवा नवीन दप्तर मागायचे.

खरच किती  सुंदर होत ना ते गांव आणि गावतल बालपण ......!!

स्वप्न



एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , 

ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , 

त्या धडपडीतला आनंद लुटन आणि 

दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , 

तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या 

पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, 

हा मानवी जीवनाचा धर्म आहे. 

मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , 
तो यामुळेच ! ”
– वी . स. खांडेकर